शिर्डी – दिनांक 2 मे 2025 रोजी प्राप्त झालेल्या धमकीच्या मेलच्या पार्श्वभूमीवर, तसेच भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या कारणास्तव सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल इत्यादी साहित्य नेण्यास दिनांक 11 मे 2025 पासून तात्पुरती बंदी लागू करण्यात आली होती.
आता नवीन आदेशान्वये, दिनांक 13 जून 2025 पासून फक्त हार व फुले समाधीस्थळी अर्पणासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाविकांना खरेदी केलेल्या हार–फुलांची पावती प्रवेश करताना दाखविणे बंधनकारक असणार आहे. प्रसाद, शाल व इतर पूजासाहित्यावर पूर्वीप्रमाणेच बंदी राहील.
सर्व साई भक्तांनी संस्थानच्या सुरक्षा उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.