आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत गोंदीया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील ४० किशोरवयीन मुला-मुलींनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी श्री संदिपकुमार भोसले व संरक्षण अधिकारी श्री रोहिदास माळी यांनी त्यांचे स्वागत केले.